मंथन (विचार)मनोरंजन

का बदलायचं वेळेनुसार?

का बदलायचं वेळेनुसार?

१९९८ मध्ये Kodak कंपनीत १,७०,००० कर्मचारी काम करीत होते, ती कंपनी जगातील सर्वात जास्त ८५% फोटो पेपर बनवून विकत होती. काही वर्षांनंतर Digital photography नं कंपनीला बाजारातून बाहेर काढून टाकलं, Kodak कंपनीचं अक्षरश: दिवाळं निघालं. सर्व कामगार रस्त्यावर आले…

HMT (घड्याळ)
BAJAJ (स्कुटर)
DYNORA (टीव्ही)
MURPHY (रेडिओ)
NOKIA (मोबाईल)
RAJDOOT (बाईक)
AMBASDOR (कार)

या सर्व कंपन्यांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. तरीसुद्धा त्या बाजारातून बाहेर फेकल्या गेल्या.

कारण?

ह्या कंपन्या वेळेनुसार बदलल्या नाहीत.

तुम्हाला अंदाज नसेल की येणाऱ्या १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज चालणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद होतील!!

चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपलं स्वागत…

Uber हे फक्त एक software आहे! त्याची स्वत:ची एकही car नाही ! तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi company आहे!

Airbnb जगातील सर्वांत मोठी Hotel Company असूनही तिचं स्वत:चं असं एकपण होटेल नाही!

Paytm,Ola cabs,oyo rooms यांसारखी खुप उदाहरणं आहेत!

US मधल्या तरुण वकीलांना कोणत्याही प्रकारची कामं नाहीत, कारण IBM Watson नावाचं software क्षणार्धात legal Advice देऊन टाकतं!

येणाऱ्या काळात १० वर्षांनंतर US मधील ९०% वकील बेरोजगार होतील, जे १०% वाचतील ते फक्त super Specialist राहतील!!

Watson Software माणसाच्या तुलनेत Cancer चं Diagnosis ४ पट जास्त Accuracy नं करतो!२०३० पर्यंत Computer माणसांपेक्षा जास्त Intelligent होणार आहेत

२०२९ पर्यंत Driverless Cars रस्त्यावर उतरलेल्या असतील!
२०३० पर्यंत एका असामान्य आविष्काराने जगाला बदलून टाकायला सुरुवात केलेली असेल!

येत्या १० वर्षाच्या काळात जगातील रस्त्यांवरून किमान ९०% Cars गायब झालेल्या असतील…ज्या वाचतील त्या एकतर Electric Cars असतील. नाहीतर Hybrid… Petrol ची खपत ९०% कमी होऊन जाईल! सर्व अरब देश कंगाल झालेले असतील!

आपण Uber सारख्या एका Software नं कार मागवायची की Driverless Car क्षणार्धात आपल्या दारात उभी राहील…

Car Driverless असल्याने ९०% Accidents होणं बंद होईल… Car Insurance नावाचा धंदा बंद पडेल !!

ड्रायव्हरला रोजगार जगात राहणार नाही. शहरात रस्त्यावरील ९०% Cars गायब झाल्या तर Traffic आणि Parking सारख्या समस्या आपोआप मिटतील.

मागच्या ५ ते १० वर्षात अशी कोणतीही जागा नव्हती की तिथं PCO नव्हता..

तो PCO बंद झाला. नंतर PCO वाल्यांनी फोनचा रिचार्ज विकायला सुरुवात केली! आता तर रिचार्ज पण आँनलाईन झालाय!

तुम्ही कधी लक्ष केंद्रित केलं का?

आज काल बाजारात सर्वाधिक दिसणारं तिसरं दुकान फक्त मोबाईल फोनचं आहे!
Sale, services, recharge, accessories, repair, maintenance ची !

आता तर Paytm नं व्यवहार होतात. रेल्वे तिकीटाचं फोनवर बुकिंग तर पैशांची देवाण घेवाण मोबाईल मार्फत…

Currency Note च्या जागेवर पहिल्यांदा Plastic मनीने आली होती, आता तर Digital Transaction मध्ये रूपांतर झालं!

जग फार वेगात बदलत आहे! डोळे, कान, नाक उघडे ठेवा नाहीतर मागं राहाल!

वेळेनुसार वेळोवेळी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा.

यासाठी प्रत्येक माणसानं वेळेनुसार व्यापार आणि स्वभाव बदलत राहायला हवं!

“Time to Time Update & Upgrade”

वेळेनुसार चालत राहा आणि यशस्वी बना!

आता येणाऱ्या काळासाठी अपडेट असणं व त्याबरोबरच जनरेशन गॅप लक्षात घेऊन जुने विचार मोडीत काढून नवीन विचार आत्मसात करणे अत्यंत जरूरी आहे इतकंच!
धन्यवाद !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}