देश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

चुक! अतिशय चूक ! स्थळ : दाभोळकर कॉर्नर सिग्नल, कोल्हापूर वेळ :- दुपारी २

दान केल्यानं पुण्य लागतं. जमेल तितका दानधर्म करावा. आणि विशेषतः एखाद्या गरीब भिकारणीला पैसे देऊन तिच्या मुलाच्या दुधाची सोय करावी.

चुक! अतिशय चूक !

स्थळ : दाभोळकर कॉर्नर सिग्नल, कोल्हापूर

वेळ :- दुपारी २

वैशाखातली रणरणती दुपार ! ऊन मी म्हणत होतं. उन्हाकडे उघड्या डोळ्यांनी बघवत नव्हतं. वैतागून गेलेले लोक उगाचच एकमेकांवर खेकसत होते. डांबरी रस्त्यावरून उठणाऱ्या पारदर्शक झळा जीवाची तगमग वाढवत होत्या.

भिकारी !

सिग्नल वर त्यांचा कसा अपवाद असणार ? लंगडे, लुळे, धडधाकट यांच्यासोबत रडणारी लहान मुलं काखोटीला मारून लोकांच्या सहानुभूतीचा गैरफायदा घेणाऱ्या भिकारणी सुद्धा मागे नव्हत्या. अशीच एक भिकारीण एक कळवळून रडणारं मूल घेऊन जमेल तितक्या लोकांना आर्जवं करत होती.

विषय नेहमीचाच. मुलाच्या दुधासाठी पैसे हवेत.

माझ्या शेजारीच उभ्या असलेल्या एका कारमधून एक स्त्री उतरली आणि भिकारणीशी बोलायला लागली. अगदी जवळ असल्यानं मला त्यांचं संभाषण ऐकू येत होतं. तिनं एक शंभरची नोट काढली आणि देऊ केली पण त्या बदल्यात तिनं थोड्या वेळासाठी रडणाऱ्या बाळाची मागणी केली. भिकारणीने आनंदाने तिची मागणी स्वीकारली.

कसं कोण जाणे पण त्या स्त्री ला कळलं होतं कि बाळ भुकेनं रडत नाहीये (स्त्रियांना याची दैवदत्त देणगी असते).

त्या रडणाऱ्या साधारण एक वर्षाच्या मुलाचे कपडे तिनं दूर केले आणि एक जळजळीत सत्य समोर आलं.

लहान बाळाच्या मांड्यांवर आणि पोटावर चिमटे लावले होते.

यासाठीच ती भिकारडी वारंवार त्याच्या अंगावरून हात फिरवत होती जेणेकरून त्याच्या वेदना वाढाव्यात. ते रडल्याशिवाय लोक पैसे कसे देणार ?

पण लोकांना वाटावं कि किती माया आहे पोरावर तिची !

पैशासाठी माणूस इतका क्रुर होऊ शकतो ?

पाहणारे आजूबाजूचे लोक प्रचंड खवळले होते. थोड्याच वेळात भिकारणीचा चेहरा ओळखण्यापलीकडे गेला. पोलीस पोचेपर्यंत तिला प्रचंड मारहाण केली गेली.

काही दिवसांनी आलेल्या वर्तमानपत्रातील बातमीनुसार. हैदराबाद येथून पळवण्यात आलेलं ते बाळ आपल्या आई वडिलांकडे सुखरूप परत गेलं. त्याच्या आईनं त्या स्त्री चे अश्रूंनी पाय भिजवले होते. आनंदाश्रु अर्थात !

पोलिसांचीही कमाल कि त्यांनी त्या बाळाचे पालक शोधून काढले.

पण त्या स्त्रीच्या धैर्याला माझा सलाम !

माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती !

दानाच्या उद्देशानं जेव्हा तुम्ही कधी आपलं पाकीट उघडाल तेव्हा एक खात्री असूद्यात कि दान सत्पात्री झालं पाहिजे, न जाणे आपलं दान अजून एखाद्या लेकराचं आयुष्य उध्वस्त करायचं!

तेव्हा मग समाज सांगतो कि दान करणं चांगलं, पण त्यात “सत्पात्री” हा उल्लेख व्हायला हवा.

वाचल्याबद्दल धन्यवाद ! Forwarded

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}