Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

24 बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग २४ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग २४
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
त्यानंतर एक एक रुग्ण गावात सापडू लागले. तात्यारावांच्या घराच्या शेजारी असलेल्या घरात कर्त्या पुरुषाला प्लेग झाला. बघता बघता त्याच रात्री तो कण्हू लागला. रात्रीच्या भयाण शांततेत त्याचा आवाज अधिकच येऊ लागला. मुलांना भीती वाटेल म्हणून तात्यारावांच्या वडिलांनी सगळ्यांना घरात खालच्या खोलीत झोपवले. तिथेही आवाज येतच होता.
 तात्यारावांना झोप काही येत नव्हती. त्यामुळे ते पायऱ्यांवर जाऊन बसले आणि शेजारी काय घडत आहे, याचा अंदाज घेऊ लागले. थोड्याच वेळात तो शेजारी किंकाळ्या मारू लागला.
 त्यास वेदना सहन होत नव्हत्या. त्याच्या घरच्यांनी तात्यारावांच्या वडिलांना बोलावले. ते जाऊन आले. प्लेग हा संपर्कजन्य रोग असल्याने रोग्याच्या घरी त्याचे नातेवाईक देखील फिरकत नसत. काही वेळातच पहाटेच्या सुमारास त्या घरातून रडारड ऐकू येऊ लागली. अख्खी रात्र त्या भयंकर आवाजातच गेली होती.
हे सगळ बघत असतानाच तात्यारावांच्या मनात अगदी नकळत विचार येऊ लागले की, आपल्या घरात या प्लेगने प्रवेश केला तर? तात्याराव नेहमी वाईटात वाईट काय होईल याचा विचार करून त्याबद्दल स्वतःला तयार करत असत. हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे एक विचार मनात अल्यासारशी विचारांची मालिका त्यांच्या मनात उसळू लागली.
‘आपल्या घरावरच जर प्लेगचा कहर कोसळला तर आपण काय करावे? वडील प्लेगने वारले तर? आपण पोरके होऊ. सरकारी लोक आपले घर उस्कटतील, सामानाची फेकाफेक करतील. भावाची काळजी आपण घेऊ. पण भाऊच प्लेगने वारला तर! अण्णांना किती शोक होईल, आपणास केवढे तरी वाईट वाटेल.
 पण मग आपणास धीर धरून अण्णांना समजवावे लागेल. पण जर आपणच प्लेगला बळी पडलो तर? तो आपला ‘दुर्गादास विजय’ ग्रंथ आणि त्या कविता आणि आपले ‘सर्व सार संग्रह’ वगैरे लेखन प्रसिद्ध करण्याची विनंती वडिलांना अगदी शेवटची इच्छा म्हणून करायची.’
असे एक ना अनेक विचित्र विचार आणि तात्यारावांनाच स्वतःला अपशकुनी वाटणारे विचार त्यांच्या मनात येऊन गेले. आणि तरीही प्रत्येक संकटास अविचलपणे तोंड देण्याच्या आपल्या मनाच्या तयारीने थोडे हायसे देखील वाटले.
चोवीस तासांत धडधाकड शेजारी डोळ्यासमोर वारला होता. आता पुढचे सोपस्कार पार पाडण्यासाठी सरकारी लोक आले. त्यांनी घराची कौले उस्कटली. सामानाची, धान्याची सुद्धा अंगणात फेकाफेकी करून घर धुवून काढले. आणि रडारड करत असलेल्या बायका मुलांना घरातून बाहेर काढून गावाबाहेर जाऊन राहण्यास सांगितले.
 गावाबाहेर त्यांच्या राहण्याची सोय करण्याची जबाबदारी मात्र सरकारची नव्हती.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य  (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.)  9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}