मंथन (विचार)

अनुभव अतिशय अंतर्मुख करणारा –नितीन सदाशिव कुलकर्णी.

नमस्कार,
मी नितीन सदाशिव कुलकर्णी.
अलीकडेच मी संभाजी नगर ला गेलो होतो.
तेव्हा एका वृद्धाश्रमात जाण्याचा योग आला.
तेथे मला आलेला अनुभव
अतिशय अंतर्मुख करणारा होता. तो आपणा सर्वांसमोर सादर करण्याची इच्छा आहे

————————————

२३ मे रोजी संध्याकाळी, एका वृद्धाश्रमात जाण्याचा योग आला

आधार वृद्धाश्रम.
संभाजी नगर.

काहीतरी सुरुवात करावी म्हणून ५० बिस्किटांचे पुडे
येथील आज्जी आजोबांसाठी बरोबर नेले होते.

श्री. गणेश डोणगावकर हे ह्या आश्रमाचे व्यवस्थापक आहेत
आपल्यातलेच आहेत.
२ तास तेथे होतो.
तेथे पुरुष व स्त्रिया मिळून २६ जण आहेत.
सगळ्यांना भेटलो,
डोणगांवकर माझ्या बरोबर होतेच.
२६ पैकी निम्याच्या वर, बेड वरून उठूही शकत नाहीत. त्यांचे सर्व काही करावे लागते.

जळगाव, लातूर, जिंतूर,
बंगलोर, नांदेड, नाशिक
वर्धा, अशा वेग वेगळ्या ठिकाणचे लोक आहेत.

अगदी दोन तीन लोकांनाच घरून भेटायला त्यांचे नातेवाईक येतात, बाकी कोणालाही भेटायला कोणीही येत नाही.

एक ८८ वर्षाचे गृहस्थ होते, आयुष्यभर RSS चे काम केलेले, त्यामुळे तत्वाला धरून. ५, ६ वृद्धाश्रम बदलले, आता येथे स्थिरावले.
२, ४ आज्जी व आजोबा छताकडे डोळे लावून पडलेले, चेहऱ्यावर कोणतेही भाव नाही, रिस्पॉन्स नाही,
सर्व काही bed वर,
काय होतं हेही सांगता येत नाही, श्वास चालू आहे म्हणून जगायचे ह्या स्थितीत.
काही जणांना कोणीही नातेवाईक नाहीत, तर काही जणांच्या चेहऱ्यावर नातेवाईक असूनही भेटायला येत नाहीत
ही वेदना.
एकाने कॉलेज मध्ये लॅब असिस्टंट म्हणून आयुष्यभर काम केलेले तर एक जण कंपनी मधून चांगल्या पोस्ट वरून निवृत्त.
एक अंध आजोबा तर एक दोन जण ऐकू न येणारे.
एक चांगल्या स्थितीतील आज्जी , नियमित हरिपाठ घेणाऱ्या.

आपल्याला कोणीतरी भेटायला येईल ह्या प्रतीक्षेत कायमच असणारी ही सर्व मंडळी.

सर्वांना भेटता भेटता अनेक वेळा डोळ्यातून येणारे अश्रू महत्प्रयासाने रोखावे लागले.

आज, श्री. डोणगावकर व त्यांचे सहकारी ह्या सर्व लोकांची सेवा गेली अनेक वर्षे अखंडपणे करत आहेत.
फक्त एकदाच आश्रमास भेट दिलेले पुण्यातील कोणी एक कुलकर्णी , गेली अनेक वर्षे आश्रमाचे २५००० रुपये भाडे गेली अनेक वर्षे भरत आहेत.
आश्रमास कोणतेही अनुदान नाही , केवळ काही लोकांच्या मदतीवर हे काम चालले आहे.

अशा ठिकाणी भेट दिल्यावर मनात विचार येतो, हे वृद्धाश्रम नसते तर ह्या लोकांचे काय झाले असते.
मुळातच वृद्धाश्रम निर्माण होण्याची गरज उदयास आली हेच आपले दुर्दैव.

जवळपास प्रत्येक शहरात असे अनेक वृद्धाश्रम आहेत, त्यामुळे असे एकूण किती वृद्ध असतील ह्या कल्पनेनेच मन विषण्ण होते.

आपल्याला जे शक्य आहे ते आपण करत राहायचे,
एवढेच आपल्या हातात आहे.

🙏🙏🙏

——————————-

नितीन सदाशिव कुलकर्णी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}